
भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर महायुतीच्या सोबत असलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपा पक्षश्रेष्ठीला याबाबत पत्र लिहिलं असून शरद पवारांवरील टीका थांबवण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपाकडून सातत्याने शरद पवार यांना लक्ष करत त्यांच्यावर जहरी टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत शरद पवार हे भटकती आत्मा असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतला होता. त्याचबरोबर हे वक्तव्य अजित पवार यांना देखील पटलेलं नव्हतं. याचा फटका लोकसभेत बसला असल्याचं माजी आमदार विलास लांडे यांनी म्हटल आहे. त्यामुळे अमित शहा यांनी शरद पवारांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हणणं योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्याचा आगामी विधानसभेवर परिणाम होऊ शकतो, असे देखील त्यांनी अधोरेखित केल आहे.
विलास लांडे म्हणाले, ”आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असे वाटते की, या पद्धतीने बोलणं योग्य नाही. ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील कार्यक्रमात भटकती आत्मा अशी टीका केली होती. या विधानाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले आहेत. भाजपने याबाबत चूक सुधारणे महत्त्वाचे आहे. मला वाटते शरद पवारांच्या बाबतीत जास्त बोलू नये आणि बोलले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकेल. खरे तर मला व्यक्तीद्वेष नाही. मात्र, शरद पवार आमचे दैवत मानतो. ८४ वर्षांच्या व्यक्तीवर बोलू नये.
आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असे वाटते की या पद्धतीने बोलणं योग्य नाही ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पुण्यातील भटकती आत्मा शरद पवार हे भटकते आत्मा आहेत असे म्हटले होते. या विधानाचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीने याबाबत चूक सुधारणे महत्त्वाचे आहे महत्त्वाची वाटते शरद पवारांच्या बाबतीत जास्त बोलू नये आणि बोलले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका बसू शकेल.




