पिंपरी : सूक्ष्म, लघु उद्याोगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्याोगिक भूखंडावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधलेले गाळे अद्याप धूळखात पडून आहेत.
गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यास उशीर झाल्यामुळे ‘एमआयडीसी’ने महापालिकेला १४ कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. दंड भरणे शक्य नसल्याची भूमिका महापालिकेने घेतली असून, ‘एमआयडीसी’बरोबर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्याला होत असलेल्या विलंबाचा फटका उद्याोजकांना बसत असल्याचे उद्याोजक संघटनेचे म्हणणे आहे.
भोसरी ‘एमआयडीसी’ परिसरात सूक्ष्म उद्याोजकांसाठी नेहरूनगर येथील टी ब्लॉक २०१ येथे ३०६ औद्याोगिक गाळे उभारण्याचे पालिकेने नियोजन केले. त्यासाठी ‘एमआयडीसी’कडून सन १९९५ मध्ये ९५ वर्षांसाठी जागा घेतली. सन २००६ मध्ये औद्याोगिक गाळे उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. महापालिकेला गाळे बांधण्यास २०११ पर्यंत उशीर झाल्यामुळे ‘एमआयडीसी’ने महापालिकेला चार कोटी ४३ लाख रुपये दंड लावला. त्यानंतर पुन्हा वेगाने कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळे ‘एमआयडीसी’ने पुन्हा महापालिकेला पत्र पाठवून दंडाची रक्कम भरावी लागेल, असे कळवले. त्यानुसार, २०२४ पर्यंत दंडापोटी सुमारे १४ कोटी भरावे लागणार आहेत. ही रक्कम कमी करण्यासाठी ‘एमआयडीसी’कडे प्रयत्न सुरू आहेत.




