पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद – ए मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या मेळाव्याला सर्व जाती धर्मातील धर्मगुरू यांना आमंत्रित करण्यात आले आहेत. लांडेवाडी भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पवार साहेबांच्या उपस्थित पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पत्रकार परिषदेला माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, भाऊसो भोईर, मंगला कदम, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, शमीम पाठाण, युवक अध्यक्ष शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पिंपरी विधानसभेचे आमदार आण्णा बनसोडे , भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, मा.महापौर आझमभाई पानसरे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे सर्व माजी महापौर , नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बुधवार दि. ११ में २०२२ रोजी राजमाता जिजाऊ कॉलेज, लांडेवाडी , भोसरी या ठिकाणी सांयकाळी ६:०० वा. होणार आहे.
हिंदू , मुस्लिम , शीख , ख्रिश्चन , बौध्द धर्मातील – पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख धर्मगुरूंना सदर कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात येणार आहे. सध्या केंद्रातील भाजपा सरकार हे राज्यातील ज्या पक्षाचे राजकिय अस्तत्व संपत आलेले आहे, अशा राजकीय पक्षाला पुढे करून महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम चालू आहे तसेच प्रक्षोभक भाषणे करून हिंदू – मुस्लिम यामधील दरी निर्माण करण्याचे काम करताना दिसत आहे . समाजात अशांतता निर्माण होऊन समाजामध्ये भीतीदायक वातावरण तयार करण्याचे काम भाजपाच्यावतीने चालू आहे. केंद्रातील भाजप सरकार अतिशय खालच्या स्तरावरचे राजकारण करून सत्तेचा दुरुपयोग ते स्वत : चे राजकिय स्वार्थ साधण्यासाठी काम करताना सर्व सामान्य जनतेला दिसत आहे.
समाजात अशांतता निर्माण होऊन समाजामध्ये भीतीदायक वातावरण तयार करण्याचे काम भाजपाच्यावतीने चालू आहे . केंद्रातील भाजप सरकार अतिशय खालच्या स्तरावरचे राजकारण करून सत्तेचा दुरुपयोग ते स्वत : चे राजकिय स्वार्थ साधण्यासाठी काम करताना सर्व सामान्य जनतेला दिसत आहे . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , शाहू , फुले , आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील सुज़ जनता अशा चुकीच्या गोष्टीला कदापी खतपाणी घालणार नाही . जातीयवादी पक्ष व धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना जनता आगामी काळात त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही . शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांच्या ५५ वर्षाच्या सामाजिक व राजकिय जीवनामध्ये काम करीत असताना आपल्या देशातील सर्वसामान्य नागरीक यांना केंद्रबिंदू मानून काम केलेले आहे . आपल्या देशात विविध जाती – धर्म , पंथांचे लोक गुण्या गोविंदाने राहतात . सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार व प्रचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविण्यासाठी ” राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने -ईद – ए – मिलन ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.




