पिंपरी : पिपंळे सौदागर येथे महावितरणचा हलगर्जीपणामुळे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा घेतला बळी, दोषींवर कडक कारवाई तसेच मेंढपाळास नुकसान भरपाई देण्याची मागणी मा. विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
पिपंळे सौदागर येथील विश्वशांती कॅालनी गावठाण बीआरटीएस मार्गालगत मेंढपाळ शेळ्यांचा कळप घेवुन जाताना रस्त्यालगत असणाऱ्या महावितरणचा डी.पी बॅाक्स मधील वायरचा शॅाक लागुन तीन शेळ्यांचा मृत्यु झाला आहे. मेंढपाळाच्या माहीतीनुसार सर्वांत प्रथम एक बकरी त्या डीपी बॅाक्स जवळ जावुन कोसळली त्याला वाटले तीला चक्कर आली असेल त्यामुळे मेंढपाळ त्या शेळीला पाहण्यसाठी जवळ गेला असता त्यालासुध्दा वीजेचा धक्का बसला व तो बाजुला फेकला गेला सुदैवाने नशिब बलवत्तर म्हणुन मेंढपाळाचा जीव वाचला, परंतु पुन्हा त्याजागी त्याच कळपातील आणखी दोन शेळ्या गेल्या व मेंढपाळाच्या डोळ्यांसमोर त्यांचा देखील वीजेचा धक्का लागुन जीव गेला, यात महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे ३ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.
या घटनेची माहिती मिळताच मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थाळी भेट देवुन हलगर्जीपणा करणार्या महावितरणच्या कर्मचारी, ठेकेदार, यांच्यावर कारवाई करावी तसेच त्या मेंढपाळास झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशा सुचना संबधीत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यानां केल्या. व त्वरीत सदर डीपी बॅाक्स बदलुन नविन डीपी बॅाक्स बसवण्यात यावा व विश्वशांती कॅालनी गावठाण मधील महावितरणची वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खाबांवरून असणार्या वायर या अंडरग्राउड कराव्या अशा देखील सुचना संबधित महावितरण विभागास नाना काटे यांनी केल्या आहेत.




