महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमधून काम चुकार करणाऱ्यांना हकालपट्टी करणार असल्याचा थेट इशारा दिला. मनसेच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त ते पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. हा मेळावा चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पुणे ही संघटनात्मक बाब आहे. याचे परिणाम निवडणूकीत दिसले पाहिजेत. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात कोणाला काय जबाबदाऱ्या द्यायच्या त्याचा आराखडा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
आपण फेरिवाले व्हायचं नाही…आपण दुकान बांधू
आजकाल सगळ्या पक्षांना एकच प्रश्न पडलाय ,आमदारकीला एवढी मतं मिळाली खासदारकीला एवढे पराभव झाले . या पक्षामध्ये माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात ?आताचे राजकीय फेरीवाले आहेत आज या फुटपाथवर .तिथून डोळा मारला की त्या फुटपात वर .असे फेरीवाले आपल्याला उभे करायचं नाहीत. आपण थेट दुकान बांधू .फेरीवाले होणार नाही .संघटना मजबूत करणं गरजेचं आहे, असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.
….तर त्यांची हाकलपट्टी करणार
व्यासपीठावर बसलेल्या आणि माझ्यासोबत सर्वजणांच काम मी तपासणार आहे. पुढच्या दोन दिवसात माझ्यासकट सगळे प्रत्येकाचं काम काय असणार ? दर 15 दिवसात ते तपासला जाणार .मी ही यंत्रणा वरपासून खालपर्यंत लावत आहे .जर मला जाणवलं हा पदाधिकारी ,कोणी का असेना. जर मला जाणवलं तो कामचुकार आहे. तर त्याला मी पदावर ठेवणार नाही.
त्यानंतर ज्याला ज्या फुटपाथव जायचं आहे त्याने त्या फुटपाथवरं जाव. असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, येत्या 12 तारखेला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या त्याला देण्यात येतील .प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या टीम त्यांच्यापर्यंत येतील .ही संघटनात्मक गोष्ट आहे .या संघटनात्मक गोष्टीचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजेत .त्या दृष्टिकोनातून ही संरचना केली जात आहे असेही राज ठाकरे म्हणाले .गुढीपाडव्याच्या दिवशी येत्या 30 तारखेला शिवतीर्थावर राज ठाकरे बोलणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासोबतच राज ठाकरेंनी कुंभस्नानावरुनही पदाधिकाऱ्यांना झापलं.
या सगळ्या अंधश्रद्धेतून बाहेर या..
मुंबईच्या एका बैठकीत मुंबईतील काही शाखा अध्यक्ष आणि मुंबईतील काही विभागाध्यक्ष त्या मेळाव्याला हजर झाले नाहीत. म्हणून त्यांची हजेरी घेतली .प्रत्येकाला विचारलं तर एकेक कारण दिली.त्यातील पाच-सहा जणांनी सांगितलं कुंभला गेलो होतो. गधड्यांनो करता कशाला एवढी पापं .आल्यावर मीही विचारलं आंघोळ केलीस ना ?यावेळी सभागृहात हशा पिकला होता बाळा नांदगावकर आले आणि साहेब कमंडलूमधून पाणी आणलं . मी हट् म्हटलं. कोण पिणार ते पाणी? पूर्वीच्या काही ठीक होतं पण मी सोशल मीडियावर बघतोय कुंभला गेलेल्या बायका कसं कुंभ स्नान करतात. दोन वर्षे तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत.
नुकताच करोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहेत. कुणालाही कुणाचं देणंघेणं नाही. आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडलं जातं. नदी अस्वछता हा कळीचा मुद्दा आहे. आता तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा. असे म्हणत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना झापलं.




