सांगलीः आय लव्ह यू म्हणायचे आणि नंतर लफडी करायची ही राजकीय पक्षांची सवयच आहे. भाजपा – शिवसेना युतीच्या काळातही अशी खेचाखेची सुरू होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
सांगली दौऱ्यात पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार पराभूत झाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “सगळेच राजकीय पक्ष अशी खेचाखेची करत असतात. आय लव्ह यू म्हणायचं आणि नंतर लफडी करायची, ही सगळ्याच राजकीय पक्षांची जुनी सवय आहे. शिवसेना आणि भाजपाची युती असताना देखील दोन पक्षांमध्ये अशी खेचाखेची होत होती, असंही ते म्हणाले.



