वडगाव मावळ : मावळ तालक्यातील आंद्रा धरण १०० टक्के व वडीवळे धरण ८४ टक्के भरले असून आंद्रा धरणाच्या सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग आंद्रा नदीत सुरू झाला आहे तर वडिवळे धरणांतून ३ हजार ५०० क्युसेकने कुंडलीका नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
वडिवळे धरणांतून ३ हजार ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग कुंडलीका नदीत सुरू आहे. कुंडलिका,आंद्रा या दोन्ही नद्या इंद्रायणी नदी ला येऊन मिळत असल्याने पुर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.




