
मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगावातील सात महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. सात गृहिणींनी ८० रुपयांच्या भांडवलासह सुरू केलेला पापड उद्योग कोट्यवधी ग्राहकांच्या घरामध्ये पोहचण्यासाठी जसंवतीबेन यांचे मोलाचे योगदान होते. जसवंतीबेन पोपट यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेशी संबधित विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजऋण कायम फेडण्याचा प्रयत्न केला.