विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बंडखोरी केलेले लोक आमचेचं आहेत. त्यांची समजूत काढण्यात आम्हाला नक्की यश येईल असा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. आज फडणवीस भाजपच्या विदर्भ विभागीय कार्यालयात पोहोचले आले होते. या ठिकाणी त्यांनी भाजपचे कार्यालयीन कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेत दिवाळी फराळ घेतला.
भाजप हा संघटनेच्या आधारावर, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आम्ही सगळे कार्यकर्ते विदर्भ विभागीय कार्यालयात येतो. इथं एकत्र दिवाळी फराळ घेतो असे फडणवीस म्हणाले. भाजप हा पक्ष संघटनेच्या आधारावर, कार्यकर्त्यांच्या आधारावर चालणारा पक्ष आहे. संघटना आणि कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे. तेच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील असे फडणवीस म्हणाले. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, बंडखोरी केलेले लोक आमचेचं आहेत. त्यांची समजूनत काढणं आमचं कर्तव्य असल्याचे फडणवीस म्हणाले. रोष मोठा असतो पण पक्षाचं व्यापक हित ठेऊन अनेकांनी माघार घेण्याची मानसिकता झाली असल्याचे फडणवीस म्हणाले.



