
पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएसने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात कोरोनानंतर नवं संकट येणार याची भीती नागिकांच्या मनात आहे. या आजाराची लागण होण्याच मुळ कारण दुषित पाणी असल्याचा दावा आरोग्यतज्ज्ञांनी केला आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा फेटाळत जीबीएसची लागण पाण्यामुळं नाही तर कोंबड्यांमुळं होत असल्याचे म्हटलं आहे.
जीबीएस आजार हा पाण्यामुळे होत असल्याचा दावा याआधी केला जात होता. त्यापार्श्वभूमीवर नागरिक मोठी खबरदारीसुद्धा घेत होते. पण या आजाराचं संक्रमण होण्यामागील आणखी एक कारण आता समोर आलं आहे.
फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे अशी महितीदेखील त्यांनी यावेळी दिली.
नेमकं काय म्हणाले अजितदादा?
पाण्यामुळं या आजाराची लागण झाली असं आपल्याला वाटतं पण तसं नाही. खडकवासला परिसरातील काहींचं म्हणणं आहे की, कोंबड्यांमुळे या आजाराची लागण झाली. त्याबाबत अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. मी आता राजेंद्र भोसले यांना प्रेसनोट काढायला सांगणार आहे. तिथल्या कोंबड्यांची व्हिल्हेवाट लावायची गरज नाही. फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आत्तापर्यंत 124 जीबीएस बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर बाधित रुग्णसंख्या 208 वर पोहोचली असून त्यातील 181 रूग्णांना जीबीएसचं निदान झालंय. पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहेत.
