गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला आहे. टेकऑफपूर्वी एका मालवाहू मालवाहू ट्रकने अकासा एअरलाइन्सच्या QP1410 या विमानाला धडक दिली. हे विमान मुंबईवरुन दिल्लीला जाणार होते. या अपघातात विमानासह आणि ट्रकचेही नुकसान झाले आहे. या अफघातानंतर या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले व प्रवासांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.
विमान उड्डाणासाठी अयोग्य
या घटनेनंतर अकासा एअरलाईन्सने याबाबत माहिती दिली आहे. यात कंपनीने म्हटले की, सध्या सर्वकाही ठीक असून कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जाण्याची गरज आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात एअर इंडियाचे विमान कोसळले होते. या घटनेत 241 विमान प्रवाशांसह 270 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये हे विमान कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला होता.