अहो सदाभाऊ खोत निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा.भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली गरळ ओकली,आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं! भाऊ हे भाजपावाले घासभर खाऊ घालतात आणि कोस भर चालत नेहतात. भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो” अशी भोचरी टीका विधान परिषदेत डावललेल्या सदाभाऊ खोत यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केली आहे.
अहो @Sadabhau_khot ! निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा.भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली गरळ ओकली,आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं! भाऊ हे भाजपावाले घासभर खाऊ घालतात आणि कोस भर चालत नेहतात.
भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो” @BJP4Maharashtra @LoksattaLive— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) June 8, 2022
सध्या राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचं वारं वाहतं आहे. त्यात आज भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारती, राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांना मात्र डावलण्यात आलं आहे. याची सध्या जोरदार चर्चा आहे.
मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. शेतकऱ्यांच्यासाठी मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर व महाविकास आघाडीवर टीका करताना दिसले. मात्र यातून भाजपवाले मात्र खुश आले नाहीत असे दिसले आणि त्याचाच धागा धरत आता राष्ट्रवादी युवकच्या वतीने टीका करण्यात आली आहे. “एवढी आंदोलनं, आकांडतांडव करून काय उपयोग? तिकीट तर मिळाले नाही अशी टीका केली आहे.



