मुंबई – खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वी विस्तार झााला होता. त्यानंतर आज खातेवाटप देखील पूर्ण झाले आहे. आधी मंत्रीमंडळ विस्ताराला तब्बल दिड महिना उशीर झाल्याने विरोधकांकडून टीका करण्यात आली होती, त्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक नेत्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली. अखेर आज राज्य सरकारकडून खातेवाटप जाहीर केले असून फडणवीसांकडे महत्वाची खाती देण्यात आली आहेत. या खातेवाटपानंतर कॉंग्रेकडून टीका करण्यात आली आहे.



