शिर्डी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुन्हा शिर्डी लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याचं स्वतः आठवले यांनी बोलून दाखवलं आहे. ते अहमदनगर मध्ये पत्रकारांशी बोल होते. तर शिर्डीच्या जागेवरून एकदा मी हरलो तर मी पुन्हा इच्छुक आहे. कारण मी लोकसभेचा माणूस आहे. पुन्हा माझा विचार झाला तर शिर्डीत नव्हे तर नगर जिल्ह्याच्या विकासासाठी माझ्या मंत्री पदाचा उपयोग करता येईल असं आठवले यांनी म्हटलं आहे.
तसेच मला अनेक लोकांचे फोन येतात त्यावेळेला आमची चूक झाली, तर आता माझे प्रामाणिक इच्छा आहे मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीस माझा विचार केला तर नक्कीच मी विचार करेल. लढायचं असेल तर शिर्डीतूनच लढायचं आहे पडायचं नाही असं मिस्कील वक्तव्य आठवले यांनी केला आहे.
तसेच त्यावेळी नगरची जागा बाळासाहेब विखे यांना दिली असती तर तीही आणि माझी जागा निवडून आली असती असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. तर बाळासाहेब विखे यांची इच्छा होती मी शिर्डीतून लढावी जेणेकरून त्यांना नगरची मिळेल पण राष्ट्रवादीने नकार दिला. त्यामुळे माझ्या जागेला पाठिंबा मिळाला नाही अस ते म्हणाले आहे.



