मुंबई : राज्यात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय. कोविड १९ च्या महामारी नंतर दोन वर्षांनंतर दहिहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे गोविंदांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, यंदाच्या दहीहंडीला गालबोट लागले आहे. थरावर थर रचण्याच्या नादात मुंबईत आत्तापर्यंत ७८ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमी गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालायांमध्ये उपचार सुरु आहेत.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांकडून थरावर थर रचले जातात. या थऱावरुन कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना कायमचे अपंगत्व येते तर काहींना आपला जीवही गमवावा लागतो. त्यामुळे प्रशासनातर्फे या गोविंदांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



