मुंबई : आदिवासी मंत्री गावित आहेत, परंतु शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व गिरीश महाजन गैरहजर आहेत. हे काय आहे, वरच्या सभागृहाने सांगायचं खाली आहेत आणि खालच्या सभागृहाने सांगायचं वर आहे. आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहात. आम्ही सत्तेत होतो तेव्हा मी स्वतः खालच्या सभागृहात थांबायचो आणि शंभुराजे वरच्या सभागृहात थांबायचे असे रोखठोक मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
विधानसभेच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना शिंदे-फडणवीस सरकारचे काही मंत्रीच गैरहजर असल्याने जोरदार गोंधळ झाला. आमदार हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकासमंत्री सभागृहात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर सत्ताधाऱ्यांकडून मंत्री वरच्या सभागृहात असल्याचं स्पष्टीकरण दिलं. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक होत सरकारला फैलावर घेतलं. “हे काय आहे, आम्ही असलेच धंदे केले आहेत आणि आम्हालाच सांगत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले, “हा अध्यक्षांचा अवमान आहे. हे सर्व मंत्री हजर होईपर्यंत तुम्ही सभागृह तहकूब करा. त्याशिवाय यांच्यावर जरब बसणार नाही.” यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “जयंतराव असं का करता. मी अख्खा मुख्यमंत्री तुमच्या सेवेसाठी इथं बसलो आहे.



