मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षानंतर नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात काही निवडक मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवदिनी प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्री निवडण्याचा मुहूर्त अखेर आज शिंदे फडणवीस सरकारला मिळाला. आज पालकमंत्री पदाची यादी जाहीर करताना काही मंत्र्याकडे पाच पाच जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या ५ जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
- इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा,
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर


