पुणे : विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी प्रथमच रचनात्मक धोरण जाहिर करण्यात आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) यासंबंधीची नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार संस्थास्तरावर आता शिक्षक-शिक्षकेतरांना विविध तक्रारींसदर्भात न्यायाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयसीटीईच्या ५३ व्या नियामक मंडळाने तक्रार निवारण समिती व अपिलीय समिती स्थापन करण्यास मान्यता देऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या मध्ये संस्थास्तरावरील तक्रार निवारण समितीची रचना, तक्रारीचे स्वरूप आणि तक्रार निवारणाबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तक्रारदाराचे निवारण समितीच्या आदेशावर समाधान झाले नसेल तर तो अपिलीय समितीकडे अपिल करू शकतो, असेही नमूद केले आहे.
संस्थास्तरावरील तक्रार निवारण समितीमध्ये संबंधित संस्थेचा प्राचार्य अध्यक्ष असणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक आणि मंडळाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे सहाय्यक सचिव हे दोन सदस्य असतील. तसेच संबंधित संस्थेतील एक वरिष्ठ विभाग प्रमुख किंवा निवड श्रेणी अधिव्याख्याता सदस्य सचिव असणार आहे.
संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून तक्रार सादर करावी.
– संस्थास्तरावरील तक्रारीचे निवारण १५ दिवसांच्या आतकरावे
समितीचा आदेश नसल्यास समितीच्या आदेशाची प्रत मिळाल्या पासून १५ दिवसात अपिलीय समितीकडे अपिल करावा
समितीचे आदेश तात्काळ जारी करावेत व संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी दयावी
– अपिलीय समितीने ३० दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करावे




