पुणे : यावर्षीची पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. यामध्ये मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र यांच्यात लढत झाली आहे. अंतिम सामन्यात त्याची लढत पुण्याचा मल्ल महेंद्र गायकवाड यांच्यासोबत झाली. अतिशय थरार हा सामना ठरला. दोन्ही पैलवान एकमेकांना भारी पडत होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवराज राक्षेने महेंद्रला कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलं.
मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली यात राक्षे यांनी बाजी मारली. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली यात महेंद्र गायकवाड विजयी झाले. त्यानंतर अंतिम राक्षे आणि गायकवाड या दोन्ही लढतीकडे सर्वाचं लक्ष लागलं होते. या लढतीमध्ये पै. शिवराज राक्षे याने बाजी मारत अंतिम महाराष्ट्र केसरी किताब स्वतच्या नावावर नोंद केला.
कोणी कोणाला केलं पराभूत
पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. यातील अंतिम लढती आज होणार आहेत. दरम्यान, काल झालेल्या लढतीत मॅट विभागातील पहिल्या उपांत्य लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने पुण्याच्या तुषार दुबे याचा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेख याने बुलढाण्याच्या बालारफिक शेखचा पराभव करून माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. गादी गटातील दुसऱ्या उपांत्य लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने पुण्याच्या गणेश जगताप याचा पराभव करुन अंतिम लढतीत धडक मारली आहे. गादी विभागाची अंतिम लढत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत पोहचेल. तर माती विभागातील अंतीम लढत सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीतील अंतीम फेरीत पोहोचेल.



