पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे राजीव कुमार यांनी केली. लोकसभे सोबत ओडिसा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश व आंध्र प्रदेश या राज्यातही निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या घोषणानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. या काळात कोणतीही शासकीय कामे करता येणार नाही. तसेच आचारसंहिता दरम्यान सरकार कोणत्याही बदल्या अथवा नियुक्त्या करू शकत नाही. त्यासाठी सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत
४८ हजार तृतीयपंथी मतदार
१०० वर्षांवरील मतदार २ लाख
४९.७ कोटी पुरुष मतदार
४७.१ कोटी महिला मतदार
१८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार
८२ लाख प्रौढ मतदार
महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या हिंसा आणि पैशांचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाहीत.
‘मिथ वर्सेस रियालिटी’ अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.
देशात 7 टप्प्यात होणार मतदान
▶ पहिला टप्पा – 19 एपिल
▶ दुसरा टप्पा – 26 एप्रिल
▶ तिसरा टप्पा – 7 मे
▶ चौथा टप्पा – 13 में
▶ पाचवा टप्पा – 20 मे
▶ सहावा टप्पा – 25 मे
▶ सातवा टप्पा – 1 जून
लोकसभेच्या निकालाची तारीख ४ रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे.
पहिला टप्पा :- 11 एप्रिल.
दुसरा टप्पा :- 18 एप्रिल.
तिसरा टप्पा :- 23 एप्रिल.
चौथा टप्पा :- 29 एप्रिल.
पहिला टप्पा -11 एप्रिल :-
(7 लोकसभा सीट)
नागपुर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर & यवतमाल-वाशिम.
दूसरा टप्पा -18 एप्रिल :-
(10 लोकसभा सीट)
अकोला, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड़, उस्मानाबाद, लातूर, सोलापुर.
तीसरा टप्पा -23 एप्रिल :-
(14 लोकसभा सीट)
औरंगाबाद, जलगांव, रावेर, जालना, रायगढ़, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सतारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकणगले.
चौथा टप्पा – 29 एप्रिल :-
(17 लोकसभा सीट)
नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नासिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरूर, शिर्डी, मुबई उत्तर, मुंबई उतर पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उतर-मध्य, मुंबई दक्षिण- मध्य & मुंबई दक्षिण.
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )
——————————-
देशात स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात निवडणुका संपन्न व्हावा यासाठी नियम बनवले आहेत त्यालाच आचारसहित असे म्हटले जाते लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नियमांचे पालन करणे सरकार राजकीय पक्ष आणि पक्षांचे नेते यांना मतदानकारक असते. केंद्रात रज्यातील 17 पक्ष व प्रत्येक उमेदवाराने या आचारसंहितेचे पालन करावे यासाठी निवडणूक आयोग घटनेच्या कलम 324 अन्वये बंधनकारक आहे.
या दरम्यान राजकीय पक्षांना मिरवणूक सभा काढावयाची असेल तर त्यापूर्वी परवानगी घेणे अनिवार्य असते संबंधित उमेदवाराला जवळच्या पोलीस ठाण्याला त्याची माहिती द्यावी लागते पक्षाची अथवा उमेदवारांची जाहीर सभा होणार असेल तर त्याबाबत ही कळवावे लागेल राजकीय पक्ष कोणताही असो वा अकाउंट नेता कोणताही असो त्यांना आचारसंहिताचे उल्लंघन करता येत नाही निवडणुकीच्या काळात गुन्हे दुराचार भ्रष्ट व्यवहार लाचखोरी मतदान अविश दाखवणे मतदारांना धमकवणे अथवा भवित करण्याचा प्रसार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते निवडणूक आयोगाने एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखण्यासाठी कार्यवाही ही करू शकते संबंधित व्यक्तीच्या विरोधात एफ आय आर दाखल केला जातो व दोष सिद्ध झाला तर त्याला तुरुंगात ही जावे लागते.
या गोष्टी करता येत नाहीत
- आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार नव्या योजनेची घोषणा, भूमिपूजन अथवा लोकार्पण करू शकत नाही.
- प्रचारासाठी सरकारी सामग्रीचा वापर करता येत नाही. सरकारी गाडी, बंगला, विमानाच्या वापरास मनाई,
- धार्मिक स्थळे अथवा प्रतिकांचा वापर करण्यास मनाई.
- भींतींवर लिहिलेल्या घोषणा, पोस्टर्स हटवली जातात.
- मतदारांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी वाहनांचा वापर करता येत नाही.
- मतदानाच्या दिवशी आणि २४ तास अगोदर मद्य वितरणास मनाई.
- निवडणुकीशी संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्या मंत्र्याची अथवा नेत्याची त्याच्या घरी अथवा प्रवासात भेट घेण्यास मनाई.
- पक्ष आणि उमेदवारावर व्यक्तिगत पातळीवरची टीका करता येणार नाही.
- धर्म आणि जातीच्या आधारावर मते मागता येणार नाहीत.



