मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इडियाला पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी दोन खासदारांची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही शिर्डी व सोलापूरच्या जागेचा आग्रह धरला असून भाजपने नवे मित्र मिळाल्यावर जुन्या मित्रांना विसरु नये असे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
आठवले म्हणाले, शिर्डी मधून आपण स्वतः आणि सोलापूर मधून राजा सरवदे हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून आरपीआयला जागा न मिळाल्यास मोठी नाराजी पसरण्याची शक्यता आहे,जागा मिळणे हा आमचा हक्क आहे, जनता आम्हाला विचारत आहे. आम्हाला दोन जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.



