मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघात बदलाचे वारा वाहायला लागले आहेत, असे दिसत आहे. कारण मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपदाची ऑफर दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पण ही गोष्ट नेमकी कशी आणि कुठे घडली, हेदेखील आता समोर येत आहे.
मुंबई इंडियन्यच्या संघाला वानखेडेच्या घरच्या मैदानात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ निराश झाला होता. संघाच्या मालकीणही निराश असल्याचे म्हटले जात होते. चौथ्या सामन्यासाठी बराच अवधी असल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला जामनगर येथे नेण्यात आले होते. सध्या संघ निराश आहे, त्यामुळे त्यांना उभारी मिळण्यासाठी जामनगरला नेण्यात आले होते. जामनगरमध्ये संघ पुन्हा एकत्र येईल आणि त्यांच्यामधील नातं अधिक सुदृढ होईल, असे संघ मालकांना वाटत होते. पण जामनगरमध्ये संघाच्या कॅप्टन्सीवर जोरदार चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.




