![]()
.वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली आहे. दरम्यान, वंचितकडून ही दुसरी उमेदवारी रद्द करण्यात आल्याने नक्की वंचितचं चाललंय तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावेळी वंचितने बांदल यांची उमेदवारी का रद्द करण्यात आली, याचं कारणं दिलं आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. ही उमेदवारी का रद्द केली? यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना अमरावती प्राजक्ता पिल्लेवान या उमेदवार होत्या. त्यांनाही अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितनं अर्ज न भरण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळं त्यांना या जागेवरही उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. पण याचं कारण म्हणजे अमरावतीतून प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधु आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपाला मदत होऊ नये म्हणून पिल्लेवान यांची उमेदवारी मागे घेत असल्याचं वंचितनं म्हटलं होतं.
यवतमाळ-वाशिम : या लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवलं होतं. यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात आल्यानं वंचितला मोठा धक्का बसला.
)


