
सातारा: जिल्ह्याच्या विकासासाठी जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ, बाहेरच्यांनी येऊन सांगू नये, अशा शब्दात खासदार उदयनराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच, त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही घणाघात केला. उदयनराजे लोकसभेच्या प्रचार सभेदरम्यान बोलताना त्यांनी ही टीका केली.
“पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी व आयआयटीचे वेगवेगळे प्रोजेक्ट निर्मिती करण्यासाठी तीन वेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टवर सह्या केल्या नाहीत. का, त्यांना सह्या करता येत नाहीत का? मुख्यमंत्री असतानाच त्यांनी जिल्ह्याचा विकास राखडवला”, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर केली.
उदयनराजे म्हणाले, “जिल्ह्याच्या विकासासाठी जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही आम्ही बसून घेऊ. बाहेरच्या जिल्ह्यातून लोकांनी येऊन आपल्याला सांगायचं नाही, की आमच्या जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे. आधी स्वत:चा जिल्हा बदला नंतर दुसऱ्याच्या जिल्ह्याकडे बघा”.



