नवी दिल्ली : दिल्लीत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र मोदी आज पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची वाताहत झाली. राज्यात महायुतीला १७ जागांवर यश मिळालं. पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्याला किती आणि कोणती मंत्रिपदं मिळणार याबद्दल उत्सुकता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पियूष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे या भाजपच्या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. मित्रपक्षांचा विचार केल्यास शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवलेंना पीएमओकडून संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे या पाच जणांची मंत्रिमंडळातील निवड निश्चित मानली जात आहे.
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)