गेल्या महिन्यात मुसळधार वादळी-वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला जबाबदार धरून जाहिरात लावलेल्या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मुंबईत असे अनेक धोकादायक होर्डिंग उभे असल्याचंही समोर आलं. यावरून विधान परिषदेत आमदार अनिल परब यांनी मुद्दा मांडला.



