
काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही राऊत म्हणाले.
जो जिथं जिंकणार त्यालाच संधी दिली जाईल
महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.



