राज ठाकरे या प्रोमोमध्ये बोलत आहेत, आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणं गरजेचं आहे. नुसता भाषा दिवस साजरा करणं किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, हे दिसायला छान दिसतंय, पण यातून मराठी माणसाचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको.