
शिरूर : मराठवाड्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी बीड जिल्ह्यासह मराठवाडा पाणीदार होणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील या पिढीने दुष्काळ पाहिला आहे. मात्र मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नसल्याचे अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे आज (दि.१९) दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बीड जिल्ह्याच आणि आमचे एक वेगळं नातं आहे, आणि जेव्हापासून श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आमचे येणे होऊ लागले, तेव्हापासून या नात्याला एक वेगळ्या प्रकारचा रंग आला आहे. मागच्या काळामध्ये श्री. क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या विकासाचे कार्य हाती घेतले, ते आता बरेच पुढे गेलेले असून आणखी भरपूर कामे त्या ठिकाणी करायची बाकी आहेत. पंकजाताई म्हणाल्या त्याप्रमाणे गडाचा आणि गडाच्या प्रत्येक भाविकांचा विकास झाला पाहिजे.
कृष्णा-कोयनेला पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून, वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे. मे महिन्यांमध्ये त्याचे टेंडर देखील काढत आहोत.
यावेळी हभप. महंत विठ्ठल महाराज शास्त्री आ. सुरेश धस, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. मोनिका राजळे आ. नमिता मुंदडा, माजी आ.भीमराव धोंडे, प्रताप ढाकणे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, लक्ष्मण हाके, विभागीय आयुक्त गावडे, वप्स बोर्डाचे अध्यक्ष समीर भाई काजी, भाजप ज्येष्ठ नेते रामराव खेडकर, बाबुराव केदार, प्रकाश खेडकर, माजी सरपंच वैजनाथ खेडकर, सरपंच नवनाथ खेडकर आदींची उपस्थिती होती.
