मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात एक प्रश्न उपस्थित केला.पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरलं. अजित पवार यांनी पालघरमध्ये किती जागा रिक्त आहेत? असं विचारलं
अजित पवार यांनी प्रश्न विचारताच तानाजी सावंत यांची गडबड झाली. दादांच्या प्रश्नाचं लगोलग त्याच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना उत्तर देता आलं नाही. आपण महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. पण मी अधिक माहिती घेतो आणि तासाभरात त्याचं उत्तर देतो, असं सावंत म्हणाले. माहिती एक तासात मिळेल असं वाटतं नाही. जर तसं झालंच तर हा प्रश्न आपण सोमवारी सभागृहात मांडू, असंही सावंत म्हणाले आहेत.
तासाभरात उत्तर देतो असं म्हटल्यावर विरोधक आक्रमक झाले. त्यांनी याच मुद्द्यावरून त्यांना कोंडीत पकडलं. आम्ही इतका महत्वाचा प्रश्न मांडला अन् आरोग्य मंत्र्यांना त्याचं उत्तर माहिती नसावं, असं म्हणत अजितदादांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांना त्यांच्याच विभागातील प्रश्न माहित नसावेत का? असा प्रतिसवाल त्यांनी विचारला आहे.



