मुंबई : एकनाथ शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली झुकतंय का? शिंदे सरकारमध्ये दबाव झुगारण्याची ताकद नाहीये का? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की कारण नसताना कुणाच्यासमोर झुकायचं नाही. पण इथे तर झुकायला सुरुवात झाली. अजून तर अडीच महिनेही नाही झाले”, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
५० खोके, एकदम ओके या विरोधकांच्या घोषणेच्या मिरच्या सत्ताधाऱ्यांना झोंबल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. “५० खोके, एकदम ओके या घोषणा त्यांना झोंबल्या. खरंच..खोटं नाही सांगत. रात्री बावचळून उठतात. खोकं खोकं खोकं.. ओकं ओकं ओकं! आरे कशाचं खोकं आणि कशाचं खोकं?” असा टोला अजित पवारांनी यावेळी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवरून टोलेबाजी केली. तसेच, राज्य सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतंय का? असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.



