पुणे : राज्यातून चार पाच मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा अंत लवकरच होईल असा भाजप, शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात भाजप प्रणित ईडी सरकार सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र खदखद दिसत आहे. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा लवकरच अंत असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहे.
नाना पटोले यांनी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारमध्ये असलेल्या अंतर्गत वादामुळे सरकारचा अंत होईल असंही पटोले म्हणालेत. महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सरकार आहे ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही असंही ते म्हणाले



