मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योजकांची आणि बॉलिवूडमधील काही दिग्ग्जांची भेट घेतली. दरम्यान, विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे खूप विषय महाराष्ट्रात आहेत. योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशला घेऊन जातात, कुठे आहेत मुख्यमंत्री?, पाच लाख कोटींची गुंतवणूक मुंबईतून नेतात आणि आमचे मुख्यमंत्री व त्यांच वऱ्हाड आणि बिऱ्हाड हे पुढील महिन्यात बहुतेक जर्मनीत जाणार आहेत गुंतवणूक आणायला. म्हणजे तिकडे तेव्हा बर्फवृष्टीचे हवामान असते, हे बर्फ उडवायला चालले आहेत एकमेकांवर. इथून पाच लाख कोटी उडवून घेऊन गेले योगी आदित्यनाथ तुमच्या नाकासमोरून, ही महाराष्ट्राची अवस्था आहे. अडीच लाख कोटींची गुंतवणूक इकडले प्रकल्प, हे गुजरातला पळवण्यात आले


