मुंबई : 2017 पासून राज्यात तीन भूकंप आले. यामध्ये अजित पवारांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे.
अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.
2017 मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवनवीन सरकार स्थापन झालेले पाहिले. यामध्ये पहिले पहाटेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथविधी घेतली. महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यांचे नवीन मंत्रिमंडळ झाले. यामध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली. त्यानंतर 2022 मध्ये राज्यातील राजकारणात भूकंप येऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. याही पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शपथविधी घेऊन तिन्ही सरकारमध्ये समान पद आपल्याकडे ठेवण्याचे दिसून येते.



