
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कार्यक्रमात नवं विधान भवन बांधण्याचा विचार सुरु असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या जागा 2026 मध्ये वाढणार का? असा प्रश्न उपस्थित झालाय. विधानसभेच्या आमदारांची संख्या 300 पेक्षा जास्त होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच अधिक आमदारांसाठी विधानसभेची इमारत तयार करण्याचा विचार सुरु असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
“आम्ही विधान परिषद आणि विधान सभेसाठी एक नवीन वास्तू बनविण्याचा विचार करत आहोत. आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ”, असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाच भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“सौमित्रने प्रोजेक्ट म्हणून विधानसभेचं रिडेव्हलपमेंट मोड्यूल तयार केलं आहे. ते मोड्यूल पाहिल्यानंतर मी अतुल भातखळकर यांना विचारलं की, आपण विधानसभेत असताना आपल्याला अशा विधानसभेत बसता येईल का? पण मला असं वाटतं येऊ शकतं. कारण आम्ही याबाबत विचारच करत होतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.