नवी दिल्ली – दोन दिवसापूर्वी मुंबई शहरातील दिगजच्या काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर ‘भारत जोडो’ न्याय यात्रेपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरांसारख्या बड्या नेत्याने पक्ष सोडल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा ११ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसच सोडली आहे
कपिल सिब्बल
माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी १६ मे २०२२ रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार म्हणून अर्ज दाखल केला.
गुलाम नबी आझाद
गुलाम नबी आझाद यांनी २०२२ मध्ये पक्षाचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांनी आता जम्मू- काश्मीरमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
हार्दिक पटेल
गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी मे २०२२ मध्ये राजीनामा पत्र देत काँग्रेस सोडली होती. हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्रात लिहिले होते की, पक्षातील बहुतांश बडे नेते त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतात. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अश्विनी कुमार
माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी पंजाब निवडणुकीच्या काही दिवस आधी फेब्रुवारी २०२२ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. अश्विनी कुमार हे २०१९ च्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष सोडणाऱ्या पहिल्या नेत्यांपैकी एक होते.
सुनील जाखड
पंजाब काँग्रेस युनिटचे नेतृत्व करणारे सुनील जाखड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर टीका केल्याबद्दल नेतृत्वाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी पक्ष सोडला होता. ते मे महिन्यात भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांना भाजप पंजाब युनिटचे प्रमुख बनवण्यात आले.
आरपीएन सिंग
माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग जानेवारी २०२२ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी असे करणारे ते सर्वात प्रमुख नेते ठरले. एक प्रमुख मागास नेते असलेले सिंह हे प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपी प्रचारात डावलले गेल्याने संतप्त होते.
ज्योतिरादित्य सिंधिया
सध्या केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २०२० मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले. त्यामुळे कमलनाथ सरकार पडलं.
जितीन प्रसाद
माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांचे निकटवर्ती जितीन प्रसाद यांनी २०२१ मध्ये काँग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात ते उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे सर्वोच्च ब्राह्मण चेहरा होते.
अल्पेश ठाकोर
माजी आमदार अल्पेश ठाकोर यांनी जुलै २०१९ मध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्यानंतर पक्ष सोडला होता. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राधापूरची पोटनिवडणूक लढवली. परंतु त्यांचा पराभव झाला. मात्र, गेल्या वर्षी ते गांधीनगर दक्षिणमधून विजयी झाले होते.
अनिल अँटनी
माजी केंद्रीय मंत्री ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी २०२३ च्या जानेवारीत पक्ष सोडला आणि पुढच्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. भारताला विकासाच्या वाटेवर नेण्याची अत्यंत स्पष्ट दृष्टी असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.




