पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. अखेर २३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण या सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरीकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा असून गरीब आणि शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी मोठ्या घोषणा होणार आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प २३ जुलै रोजी लोकसभेत सादर केला जाईल.अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण मंगळवारी (२३ जुलै) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असून २३ जुलै रोजी देशाचा आतापर्यंतचा ९३ वा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यावर्षी भारताला दोन अर्थसंकल्प पाहायला मिळाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता, तर आता संपूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. याआधी इतिहासात अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ वारंवार बदलली गेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी काही मोठ्या घोषणाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाकडे महाराष्ट्राच लक्ष लागलेलं आहे.




