अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण, तसेच कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप यामुळे मुंडे अडचणीत सापडले आहेत.
सरपंच आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशय
धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड सोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं जात आहे. तसेच, परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातही त्यांचे नाव घेतले जात आहे. या प्रकरणात मुंडे समर्थकांवरही संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. याशिवाय, धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना अंशतः दोषी ठरवले आहे.
अटक वॉरंटची शक्यता?
राजकीय भवितव्य धोक्यात?
या सततच्या खटल्यांमुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. महायुती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत, मात्र या आरोपांमुळे त्यांना राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते.



