
कोल्हापूर : राज्य शासनाने तालुकानिहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी घेतल्याने कोल्हापूर व गडहिंग्लज या दोन्ही बड्या बाजार समितीच्या मक्तेदारीला जबर धक्का बसला आहे. बाजार समिती नसलेल्या आठ तालुक्यांमध्ये त्या नव्याने स्थापन होणार असून या तालुक्यात बाजार समितीचे राजकारण, अर्थकारण तेजीत येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जवळची बाजारपेठ मिळावी, खात्रीने दर मिळावा यासाठी राज्यात बाजार समिती स्थापन झाल्या. आजमितीस राज्यात ३०५ बाजार समित्या तर त्याच्या अधीन ६२५ उपबाजार समित्या कार्यरत आहेत.
जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूर, गडहिंग्लज, पेठ वडगाव व जयसिंगपूर अशा चार बाजार समित्या कार्यरत आहेत. १९४५ साली कोल्हापूर जिल्हा बाजार समिती अस्तित्वात आली. पुढे अन्य तीन बाजार समित्या स्थापन झाल्या. सध्याच्या आकारमानाचा विचार करता कोल्हापूर बाजार समितीचे स्थान साडेसहा तालुक्यांमुळे सर्वात मोठे आहे. या समितीचा कारभार ही नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे वादग्रस्त राहिला. गडहिंग्लज समितीकडे साडेतीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र राहिले. पेठ वडगाव समिती केवळ हातकणंगले तर जयसिंगपूर केवळ शिरोळ तालुक्यासाठी कार्यरत आहेत.
तालुकानिहाय राजकारणाचे पर्व
