नवी दिल्लीः तुम्ही जर महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक बॅड न्यूज आहे. आजपासून (१ एप्रिल) नॅशनल हायवेवरून प्रवास करणे महाग झाले आहे. नॅशनल हाय वे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने संपूर्ण देशभरात १ एप्रिल २०२२ पासून टोल टॅक्स मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी टोल टॅक्स मध्ये जवळपास १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, वेगवेगळ्या वाहनांसाठी आता वेगवेगळा टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. १० रुपयांपासून ६५ रुपयांपर्यंत टोल टॅक्स वाढवण्यात आला आहे. कमर्शियल व्हीकलच्या टोल मध्ये ६५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांसाठी १० रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
या निर्णयानंतर अनेकांना आता जास्तीचा टोल भरावा लागणार आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे आता महाग होणार आहे. या टोल टॅक्स मध्ये १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी १० टक्क्यांहून कमी वाढ करण्यात आली आहे. ही नवे दर आजपासून देशात लागू करण्यात आली आहेत. १ एप्रिल पासून मोठ्या कमर्शियल वाहन (ट्रक, बस, आणि याच पद्धतीचे वाहने) आधी २०५ रुपये टोल देत होते. ते आता वाढून २३५ रुपये झाले आहे. कार आणि जीपसाठी टोल शुल्क १० रुपये वाढून आता ७० रुपये ऐवजी ८० रुपये झाले आहे. याचप्रमाणे मिनीबस वाहनांसाठी १०० रुपयांऐवजी ११५ रुपये मोजावे लागणार आहे
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)