पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा लक्षात घेता. प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अमलबजावणी 18 मे पासून केली जाणार आहे.अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
पावसकर म्हणाले की, यंदाच्या वर्षी हवामान विभागाने पाऊस कमी प्रमाणात होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराला पाणी पुरवठा करणार्या वरसगाव,पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मागील वर्षी 9.20 टीएमसी इतका पाणीसाठा होता. तर सध्य स्थितीला 9.70 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.पुण्याला किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतकं पाणी वाचवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.




